राजकारण
राजकारणावर जनतेची अस्वस्थता; म्हणे, लोकशीहीची हत्या! लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून सातारा जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या राजकीय हालचालींमुळे सत्ताधा...
री आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका सुरू झाली आहे. विशेषतः भाजपने ऐनवेळी आखलेल्या डावपेचांमुळे विरोधकांवर मात केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली असून, या घडामोडींवरून नेटकऱ्यांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत.या निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडींना काही नेटकरी रणनीतीचे यश मानत असताना, काहीजण मात्र याला लोकशाही मूल्यांवर घाला घातल्याची टीका कमेंटमध्ये करत आहेत. लोकशाहीची हत्या असा रक्ताने माखलेला स्लोगन तयार करून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला आहे. या स्लोगनमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.सोशल मीडियावर या घटनेबाबत विविध मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काहीजण भाजपच्या रणनीतीचे कौतुक करत आहेत, तर काहीजणांनी या प्रक्रियेवर कठोर टीका केली आहे. लोकशाही प्रक्रियेला बाधा आणून सत्ता मिळवली गेली, असा आरोप नेटकऱ्यांमधून केला जात आहे. याउलट काही नेटकऱ्यांनी ही निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार झाल्याचा दावा केला आहे.या वादामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो, असेही काही नेटकरी मत व्यक्त करत आहेत.
पुढे वाचा →
2026-04-08